दोन माणसांना, दोन शहरांना, दोन देशांना कळत नकळत एकमेकांच्या जवळ आणणारी गोष्ट म्हणजे जेवण. आणि जेवण म्हटल की मसाले हे आलेच.ज्या प्रमाणे इंधनाविना एखादी गाडी सुरु होऊचं शकत नाही त्याच प्रमाणे चविष्ठ मसाल्यांविना रुचकर जेवणाची गाडी पुढे जाऊचं शकत नाही. भारत देशाला वेगवेगळे मसाले बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पदार्थाच्या व्यापाऱ्यांचा इतिहास आहे. पूर्वी महिला वर्ग आपल्या सोईनुसार आपल्या स्वतःच्या आवडीनुसार मसाला करीत असत. पारंपरिक पद्धतीने वेगवेगळे मसाल्याचे जिन्नस छान भाजून, तळून उखळीवर कुटून १०० टक्के नैसर्गिक गुणधर्म असलेला मसाला तयार होई. मागील काही वर्षात बदलत्या काळानुसार व तंत्रज्ञाना प्रमाणे मसाला बनवण्याची पद्धतही बदलत गेली.अनेक कंपन्यांनी ग्राहकांच्या गरजेनुसार, चवीनुसार व प्रांतानुसार मसाले बनवण्यास सुरुवात केली


झटपट आणि चटपट
सध्या सर्वांनाच वेळेआधी चालायचं आहे. आत्ताचा काळ हा वेगवान गोष्टी करण्याचा व आत्मसात करण्याचा आहे. क्षेत्र कोणतंही असो, सर्व गोष्टी या झटपट व्हाव्या असं आपल्याला वाटत असतं. मग यामध्ये जेवण ही आलंच. काळ बदलला तसतसा जेवण बनवण्याच्या पद्धतीतही बदल होत गेला. पूर्वी लोक जेवण बनवण्यासाठी विशेष असा वेळ राखून ठेवत असत, महिलावर्ग फार रुची घेऊन सर्व कुटूंबासाठी जेवण करत, आजही अनेक लोकांच्या तोंडी "आमच्या वेळच्या जेवणाची चव आत्ताच्या पदार्थांना कुठे?" हे वाक्य सर्रास ऐकायला मिळतं. त्याचप्रमाणे घरातील आजी, आजोबा जुनी जाणती मंडळी त्यांच्या काळातल्या पदार्थांचे, वेगवेगळ्या मसाल्यांचे, पौष्टिकतेचे दाखले देताना पाहायला मिळतात. अनेक महिलांना, लोकांना आजही प्रश्न पडतो की अनेक काळापासून चालत आलेली पारंपरिक चव आपल्या पदार्थांना का नसते? "आमची मुलं गावी गेली की अमुक अमुक पदार्थ फार आवडीने खातात, पण तोच पदार्थ इथं घरी केला की नाक मुरडतात..

मसाले जास्त काळ टिकवण्यासाठीचे उपाय
आपल्या दररोजच्या जीवनात दोन गोष्टींना अनन्यसाधारण महत्व आहे.एक म्हणजे वेळ आणि दुसरं म्हणजे जेवण, आणि जेवण म्हटलं की मसाले आलेच. आज अनेक कारणास्तव आपल्याला घरात मसाल्याची साठवण नीट करता येत नाही, किंवा मसाले खराब होण्याच्या अनेक तक्रारी पहायला मिळतात. जाणून घ्या मसाला खराब होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी. दोन माणसांना, दोन शहरांना, दोन देशांना कळत नकळत एकमेकांच्या जवळ आणणारी गोष्ट म्हणजे जेवण. ज्या प्रमाणे इंधनाविना एखादी गाडी सुरु होऊचं शकत नाही त्याच प्रमाणे चविष्ठ मसाल्यांविना रुचकर जेवणाची गाडी पुढे जाऊचं शकत नाही. भारत देशाला वेगवेगळे मसाले बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पदार्थाच्या व्यापाऱ्यांचा इतिहास आहे. पूर्वी महिला वर्ग आपल्या सोईनुसार आपल्या स्वतःच्या आवडीनुसार मसाला करीत असत.

Health Benefits of Original high-quality Indian Spices
We would all agree that it has been a challenging and difficult year for all of us and that it has become our greatest priority to look after ourselves as well as our loved and close ones, in this pandemic. Every one of us is checking up on each other’s diets, reading forwarded messages about ayurvedic supplements and what not! But the most critical and essential commodities which we consume almost every day are spices. Spices have been a necessary part of our diet for generations, but today they are much more significant to us in healthcare. Let us tell you the core health benefits of the important spices and how we make use of the following immunity booster, raw and high-quality spices to manufacture our traditional homemade spices.

खामकर कुटुंबाच्या तिसऱ्या पिढीची यशस्वी वाटचाल.
लालबागची खमंग तिखट मसाला गल्ली, जेथे चविष्ट मसाल्यांचा सुवास नेहमी अनुभवयला मिळतो. याचं बाजारपेठेत जी.डब्ल्यू.खामकर परिवाराने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. एका छोट्याशा रोपट्यापासून झालेली सुरुवात आता एका वटवृक्षाचे रुप घेताना दिसत आहे. कुटुंबातील श्री.संकेत खामकर व श्री.संजोग खामकर यांच्या प्रमाणे ग्राहकांची हि तिसरी पिढी आज जी.डब्ल्यू.खामकर मसाले चाखत आहेत. मानवाच्या मुलभूत अत्यावश्यक गरजांपैकी एक म्हणजे अन्न. बदलत्या काळानुसार खाण-पानात झालेला बदल आणि त्यामध्ये वापरात येणारे नानाविध प्रकारचे मसाले पदार्थाला सुरेख चव बहाल करतात. हिच गोष्ट श्री.गोपीचंद वामन खामकर यांनी अगदीच हेरली आणि त्यांनी त्याप्रमाणे मसाले बनविण्यास सुरुवात केली. प्रत्येक प्रांतानुसार, राज्यानुसार वापरले जाणारे मसाले त्यांनी तयार केले. चव व सेवेमुळे मसाल्यांसाठी लोकांची आवड वाढतं गेली आणि लालबागचे जी.डब्ल्यू.खामकर मसाले ग्राहकांच्या पहिल्या पसंतीचे मसाले बनले.